This is an example of a HTML caption with a link.
Recent Post
अमर पुराणिक
दिल्लीतील तालकटोरा स्टेडियमवर भाजपाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक झाली. या कार्यकारिणीच्या दिनांक ३ मार्च रोजी झालेल्या समारोपाच्या भाषणात भाजपाच्या चार हजार प्रतिनिधींना संबोधित करताना नरेंद्र मोदी काय बोलले आणि प्रसारमाध्यमांनी काय प्रसिद्ध केले किंवा प्रसारित केले हा नेहमीप्रमाणेच याही वेळी संशोधनाचा मुद्दा आहे. नरेंद्र मोदी जे बोलतात त्यातील केवळ स्वत:च्या सोयीचीच विधाने तीही मूळ स्वरूपात न देता तोडून मोडून विपर्यास्त करून जाणीवपूर्वक संभ्रम निर्माण करणारी वक्तव्ये प्रसिद्ध करतात. हे भाजपा बाबतीत कायमच होते. नरेंद्र मोदींच्या बाबतीतही आजच नव्हे तर गेल्या १०-१२ वर्षांपासून सातत्याने होतेय. ते याहीवेळी झाले. भाजपा राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी कॉंगे्रसवर घणाघाती प्रहार केला. नरेंद्र मोदी यांनी केवळ राजकीय टीकाच केली नाही, तर विकास, पक्ष बळकटीकरण, राष्ट्रप्रेम, विकासाची तंत्र, विकासाचे आर्थिक ताळेबंद, सूत्रबद्ध तंत्र, कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य आणि प्रत्येक भारतीयाला नैराश्येच्या गर्तेतून बाहेर काढून त्यांच्या मनात बदलाची तीव्र इच्छा निर्माण करणे, विकासासाठी इच्छाशक्ती, भ्रष्टाचार मुक्त आणि तंत्रशुद्ध कामाचा मंत्रच मोदी यांनी या भाषणात दिला, पण प्रसारमाध्यमांनी यातील केवळ राजकीय विधाने सवंग पद्धतीने प्रसारित केली आणि दूरचित्रवाणीवरून कार्यक्रमानंतर होणार्‍या चर्चांमध्ये केवळ वाक्यांचा विपर्यास्त करून नकारात्मक पद्धतीने नरेंद्र मोदींबद्दल ओकता येईल तेवढी गरळ ओकत होते.

नरेंद्र मोदी म्हटले की, सर्वसामान्य भारतीय जनतेच्या नजरेसमोर येतो एक विकासपुरुष, कणखर नेता आणि कोणत्याही संकटला न घाबरणार लढाऊ राजनीतीज्ञ. लागोपाठ तीन वेळा गुजरातचे मुख्यमंत्रिपद भूषवत केलेला गुजरातचा विकास विरोधकांसह परराष्ट्रांनाही तोंडात बोट घालायला लावणारा आहे, पण माध्यमं आणि सेक्युलरवाले गोध्राकांडातील खलनायक असेच नरेंद्र मोदींचे चित्र रंगवण्यात गेली दहा वर्षे दंग आहेत. अजूनही त्यांची डोळे उघडून वास्तव पाहण्याची आणि स्वीकारण्याची मानसिकता होत नाही, पण सतत नरेंद्र मोदींबद्दल नकारात्मक प्रचार करून एकप्रकारे या माध्यम आणि सेक्युलरवाद्यांनी एकप्रकारे मोदींची खूप मोठी मदत केली आहे. नरेंद्र मोदींना देशभरातील घराघरात नेऊन पोहोचवले, पण कीतीही खोटा प्रचार केला तरी सत्य कधीनकधी बाहेर येतेच. गेल्या दहा वर्षांत हे सत्य पुरते बाहेर आलेले आहे. याचे भान अजून यांना होत नाही. कारण गुजरात सोडून इतर सर्व भारतीयांना गेल्या दहा वर्षांत गोध्रापुराण ऐकून ऐकून सर्व भारतीयांमध्ये काय आहेत नरेंद्र मोदी? ही उत्सुकता निर्माण झाली आणि ती उत्सुकता इतकी तानली गेली की, प्रसारमाध्यमांनी सांगितलेल्या गोष्टींची सत्यासत्यता पडताळून पाहण्याची प्रत्येक भारतीयाला इच्छा होऊ लागली. मग हा आम आदमी विचार करू लागला की, खरंच नरेंद्र मोदी इतके वाईट आहेत का? गेली १० वर्षे मोदींबद्दल ही माध्यम सांगताहेत त्याप्रमाणे मोदी खरेच राक्षसीवृत्तीचे ‘मौत के सौदागर’ आहेत का? नरेंद्र मोदींबद्दल अशा अनेक व्यमिश्र भावना लोकांच्या मनात निर्माण होऊ लागल्या. मग सतत दहा वर्षे या नरेंद्र मोदींबद्दल या नकारात्मक कथांचा प्रचार होत असताना गुजरातची जनता मात्र नरेंद्र मोदींच्या पाठीशी ठामपणे उभी आहे. सतत भाजपा तेथे सत्तेत आहे. विकासाबाबतीत कॉंग्रेसच्या सत्ताकाळात तळाच्या क्रमांकावर गेलेला गुजरात भाजपाची आणि नरेेंद्र मोदींची सत्ता येताच उर्जितावस्था प्राप्त करतो आणि सतत प्रथम क्रमांकावर राहतो कसा? हा प्रश्‍न प्रत्येक नागरिकांच्या मनात घर करुलागला. आणि त्यातून मग पुढे येऊ लागले वास्तव! की मोदी हे ‘मौत के सौदागर’ नसून खरे राष्ट्रभक्त विकासपुरुष आहेत. त्यांनी प्रशासनिक, तांत्रिक, व्यापार, कृषी अशा सर्वच क्षेत्रांत नवनव्या संकल्पना प्रभावीपणे राबवून गुजरातला या वैभवाच्या शिखरावर नेऊन पोहोचवले. या नरेंद्र मोदींच्या विकास गाथेचे वास्तव समजल्यानंतर मात्र प्रत्येक भारतीयाला खरे नरेंद्र मोदी कळून चुकले आणि त्या अनुषंगाने प्रसारमाध्यमांचा खोटारडेपणाही उघड झाला. यात फेसबुक, ट्वीटर, ब्लॉगर सारख्या सोशल मीडियाचा खूप चांगला उपयोग हे वास्तव जाणून घेण्यासाठी झाला.
दिल्लीतील तालकटोरा स्टेडियमवर भाजपाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक झाली. या कार्यकारिणीच्या दिनांक ३ मार्च रोजी झालेल्या समारोपाच्या भाषणात भाजपाच्या चार हजार प्रतिनिधींना संबोधित करताना नरेंद्र मोदी काय बोलले आणि प्रसारमाध्यमांनी काय प्रसिद्ध केले किंवा प्रसारित केले हा नेहमीप्रमाणेच याही वेळी संशोधनाचा मुद्दा आहे. नरेंद्र मोदी जे बोलतात त्यातील केवळ स्वत:च्या सोयीचीच विधाने तीही मूळ स्वरूपात न देता तोडून मोडून विपर्यास्त करून जाणीवपूर्वक संभ्रम निर्माण करणारी वक्तव्ये प्रसिद्ध करतात. हे भाजपा बाबतीत कायमच होते. नरेंद्र मोदींच्या बाबतीतही आजच नव्हे तर गेल्या १०-१२ वर्षांपासून सातत्याने होतेय. ते याहीवेळी झाले. 
भाजपा राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी कॉंगे्रसवर घणाघाती प्रहार केला. नरेंद्र मोदी यांनी केवळ राजकीय टीकाच केली नाही, तर विकास, पक्ष बळकटीकरण, राष्ट्रप्रेम, विकासाची तंत्र, विकासाचे आर्थिक ताळेबंद, सूत्रबद्ध तंत्र, कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य आणि प्रत्येक भारतीयाला नैराश्येच्या गर्तेतून बाहेर काढून त्यांच्या मनात बदलाची तीव्र इच्छा निर्माण करणे, विकासासाठी इच्छाशक्ती, भ्रष्टाचार मुक्त आणि तंत्रशुद्ध कामाचा मंत्रच मोदी यांनी या भाषणात दिला, पण प्रसारमाध्यमांनी यातील केवळ राजकीय विधाने सवंग पद्धतीने प्रसारित केली आणि दूरचित्रवाणीवरून कार्यक्रमानंतर होणार्‍या चर्चांमध्ये केवळ वाक्यांचा विपर्यास्त करून नकारात्मक पद्धतीने नरेंद्र मोदींबद्दल ओकता येईल तेवढी गरळ ओकत होते. काही माध्यमांनी तर, आपणच पंतप्रधानपदाचे उमेदवार असल्याचा अविर्भाव नरेंद्र मोदींच्या संपूर्ण भाषणात होता, अशा प्रकारची सवंग टीप्पणी आपल्या बातमीत केली. मोदींच्या या भाषणावर कॉंग्रेस नेते मणिशंकर अय्यर यांनी मोदींना विंचू आणि सापाची उपमा देऊन उद्धार केला. मोदींच्या भाषणातील अर्वाच्च भाषा ऐकता, मोदींकडे राष्ट्रीय नेता होण्याची क्षमता नाही, हे सिद्ध होते, असा जावईशोध कॉंग्रेसचे प्रवक्ता राजीव शुक्ला यांनी लावला. नरेंद्र मोदी यांचे संपूर्ण भाषण अतिशय संयमी, सात्विक, कोठेही न घसरलेले होते. (यु ट्यूब आणि नरेंद्र मोदी यांच्या वेबसाईटवर हे संपूर्ण भाषण उपलब्ध आहे.) ५०-५५ मिनिटांच्या भाषणात नरेंद्र मोदी यांनी कोणावरही जहरी टीका आणि वैयक्तिक टीका केली नाही, तरीही हे कॉंग्रेसचे प्रवक्ते राजीव शुक्ला महाशयांना नरेंद्र मोदी यांची भाषा अर्वाच्च वाटली आणि शुक्ला यांनी मोदी हे राष्ट्रीय नेता होण्याच्या क्षमतेचे नाहीत असे प्रमाणपत्रही देऊन टाकले. कॉंग्रेेस नेते मणिशंकर अय्यर या महाशयांनी तर स्वत:ला विंचू चावल्याप्रमाणे भ्रमित होऊन मोदींनाच साप, विंचवाची उपमा बहाल केली. गुजरात दंगलीनंतर अटल बिहारी वाजपेयी यांनी मोदींना ‘राजधर्म’ पाळण्याचा सल्ला दिला होता, हे मोदी विसरले का, असा सवाल नरेंद्र मोदींच्या संयमी भाषणावर कॉंग्रेसचे मंत्री मनोज तिवारी यांनी ट्विटरवर केला आहे. याला म्हणतात चोरांच्या उलट्या बोंबा. काही विकृत माध्यमांनी याही पुढे जाऊन ज्येष्ठ भाजपा नेते लालकृष्ण अडवाणी यांचा खडूस नेता असा उल्लेख केला. अडवाणींसारख्या ज्येष्ठ नेत्याचा उल्लेख विरोधक सुद्धा आदराने करतात. पण असा अष्लध्यपणा माध्यमांनी, काही नेत्यांनी केला आहे. माध्यमाच्या या अर्वाच्च भाषेबद्दल मात्र हे सेक्यूलरवादी, मानवाधिकार, नीतीवाल्या विचारवंत(?) मंडळींंच्या तोंडाला कुलूप घातलेले असते.
या भाषणात नरेंद्र मोदी यांनी अतिशय सुसूत्र आणि कार्यकर्त्यांना कार्यप्रवण करणारे विचार मांडले. विकासाची अनेक सूत्रं सांगितली. भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या एकनिष्ठ पुरुषार्थाचा परिणाम काय असतो ते गुजरातमधील यशाचे उदाहरण देऊन सांगितले. काळाच्या कसोटीत खरी उतरलेली भाजपाची राजनैतिक संस्कृती आणि भाजपाची विचारधारा यावर असलेल्या प्रजेच्या विश्‍वासाचा परिणाम किती सकारात्मक होऊ शकतो हे मोदींनी पंडित दीनदयाल उपाध्याय, अटलबिहारी वाजपेयी यांचे उदाहरण देऊन सांगितले.
साधारणपणे एकाच कालावधीत स्वतंत्र झालेल्या देशांच्या म्हणजे इस्त्रायल, जपान, चीन, कोरिया आदी देशांनी प्रचंड मोठी प्रगती साधली आपण मात्र मागे पडलो. याला कारण म्हणजे राष्ट्रहीताचा विचार न करणारे, इच्छाशक्तीचा आभाव असणारे सरकार असल्यामुळे भारत मागे पडला. एका परिवाराच्या हितासाठी राष्ट्रहिताचा बळी दिला गेला. तेव्हा आपण परदेशातून मागवलेले ‘पीआयएल ४८’ गहू खात होतो. आपला कृषिप्रधान भारत देश धान्याच्या बाबतीतही स्वयंपूर्ण नव्हता, पण एका लालबहाद्दूर शास्त्रींनी ‘जय जवान जय किसान’चा नारा दिला आणि संपूर्ण देशातील शेतकरी जागृत झाला. तो स्वत:च्या पायावर उभा राहिला आणि देशातील धान्याची कोठार भरून टाकली. देश कायमचा धान्याच्या बाबतीत आत्मनिर्भर झाला.
सकारात्मक इच्छा शक्ती काय असते? त्याचा प्रभाव काय असतो? याचे मूर्तीमंत उदारण म्हणजे राष्ट्रतेज अटलबिहारी वाजपेयी असल्याचे सांगून मोदी यांनी सकारात्मक राजकारण आणि विकासाभिमुख सरकार काय करू शकते याची आठवण कार्यकर्त्यांना करुन दिली. अटलजींनी अमेरिकेसारख्या महासत्तेच्या नाकावर टीच्चून अणुचाचणी घेतली. ११ मे च्या अणुचाचणीनंतर संपूर्ण जग भडकले, भारतावर दबाब आणू लागले, तात्काळ काही तासांत आर्थिक निर्बंध लादले, पण या दबावाला भिक न घालता आत्मविश्‍वास आणि बेडरवृत्ती काय असते हे अटलजींनी दाखवून देत पुन्हा १३ मे रोजी त्याहून शक्तीशाली अणुचाचणी घेतली आणि सार्‍या जगाला दाखवून दिले की, आम्ही झुकत नाही. अटलजींनी, भाजपाने प्रचंड आत्मविश्‍वासाची प्रचिती सार्‍या जगाला दिली. त्याचबरोबर देशवासीयांना भाजपाच्या नितीमत्तेची, ताकदीची आणि राष्ट्रनिष्ठेची प्रचिती दिली. त्यामुळे २१ व्या शतकातील सार्‍या जगाचे नेतृत्व करणारा देश म्हणून भारताकडे पाहू लागले. जगाने घातलेल्या निर्बंधांना भिक न घालता देशातील, परदेशातील भारतीय आप्तजनांना अटलजींनी आवाहन केले, तेव्हा या राष्ट्रपुत्रांनी  परकीय गंगाजळीने देशाची तिजोरी भरून टाकली, अटलजींच्या आणि भाजपाच्या इच्छाशक्तीने हे करून दाखवले, पण २००४ नंतर कॉंग्रेस सरकारने हे सर्व घालवले,  हे सांगून हाच आत्मविश्‍वास पुन्हा भाजपा कार्यकर्त्यात नरेंद्र मोदींनी जागृत केला आणि भाजपा कार्यकर्त्यांनी सारा देश जागृत करावा असे आवाहन केले.
मोदींनी प्रत्येक विकासकार्यांत जनसहभागाचे महत्त्व काय असते ते यावेळी विषद केले. जनसहभागाशिवाय सरकारच्या विकासाला गती येत नाही. ती गती जनसहभागाने कशी प्राप्त होते याचे ही उदाहरण कार्यकर्त्यांना दिले. गुजरातच्या जनतेला आवाहन केले की, १ पाऊल प्रत्येकाने पुढे यावे, म्हणजे संपूर्ण गुजरात ६ कोटी पावले पुढे जाईल. याचा खूप सकारात्मक फायदा झाला. भारतीय जनतेत असाच आशावाद निर्माण करणे, आत्मविश्‍वास निर्माण करण्यासाठी प्रत्येक देशवासीयांना १ पाऊल पुढे येण्याचे आवाहन केले, तर देश १२५ कोटी पावले पुढे जाईल. हाच लोक सहभाग विकासात महत्त्वाच असतो हे मोदींनी यावेळी आवर्जून सांगितले, पण कोणत्याही प्रसारमाध्यमांनी हे मुद्दे भाजपा आणि मोदींच्या घोडदौडीच्या भीतीने प्रसिद्ध केले नाही. कॉंग्रेसने जनभागीदारीचे तत्त्व संपवून टाकले. त्यामुळेच देश विकासात मागे पडत असून, भाजपाची सरकारे ही जनआंदोलने आणि जनसहभागावर चालतात, विकास कार्यक्रमावर चालतात. दूरागामी प्रभाव पाडणारे बदल हे योग्य पुरोगामी नीतीच्या विकास कार्यक्रमामुळे होतात.
२००१ साली गुजरात सरकार ६७०० कोटी रुपये तोट्‌यात होते. पण आज ४०० कोटी नफ्यात आहे. आज वीज उत्पादनात संपूर्ण देश रसातळाला गेला आहे, पण गुजरात मात्र नफ्यात आहे. वीज उत्पादनात २००१ साली गुजरात वीज उत्पादनात २५,००० कोटी रुपये इतका तोट्यात होता, पण आता गुजरात वीज उत्पादनात ७०० कोटी रुपये नफा कमावते आहे. तेही एक पैसाही विजेचा दर न वाढवता. यासाठी काय केले तर लिकेज बंद केले. यात व्यवस्थापन, सचोटी हे पैलू महत्त्वाचे असल्याचे मोदी यांनी सांगितले. कोणतीही योजना ही कॉर्पोरेट प्लान, प्रोफेशनॅलिजम आणि टेक्नॉलॉजी अपग्रेडेशन यावर चालते, याचे महत्त्व मोदींनी विषद केले.
भाजपा सुशासनात क्रमांक एक वर आहे. केवळ नरेंद्र मोदीच नव्हे, तर सर्व भाजपाच्या सरकारने दमदार कामगिरी केली आहे, मध्यप्रदेश सरकार विकासाचे उत्तम मॉडेल ठरले आहे. शिवराजसिंह चौहान, डॉ. रमणसिंह, जगदीश शेट्टर, मनोहर पर्रिकर यांची भाजपा शासित सरकारे सर्वोत्तम आहेत. याआधीचे मुख्यमंत्री कल्याणसिंह, सुंदरलाल पटवा, राजनाथ सिंह यांची सरकारंही सर्वेत्तम होती. प्रजेसाठी विकास, पारंपरिकता, व्यवस्थापन, सुशासन, ही सर्वच कौशल्ये भाजपा सरकारमध्ये आहे. सर्वांनीच चांगले काम केले आहे. केवळ मोदींनी नव्हे, असे नरेंद्र मोदींनी यावेळी आवर्जून सांगितले.
 ‘पंतप्रधान कोण होणार, नेता कोण आहे, हे  भाजपात कधीही महत्त्वाचे नव्हते व नाही. आणि भाजपात अशा उत्तम नेत्यांची वाण नाही. काय महत्त्वाचे आहे तर भाजपा महत्त्वाची आहे, महत्त्वाचे आहे लक्ष्य गाठणे आणि कर्तव्य करणे. भारतीय जनतेचा अपेक्षाभंग करण्याचा आपल्याला अधिकार नाही असे सांगून मोदींनी कार्यकर्त्यांत नवचैतन्य निर्माण केले आहे. कॉंगे्रसपासून देशाला मुक्त करणे हे देशभक्तीचेच कार्य आहे, असे मोदी यांनी सांगितले.
देशवासीयांमध्ये पसरलेला ‘आता काही होणार नाही’ हा निराशावाद काढून टाकण्याचे आवाहन मोदींनी केले. मोदी म्हणाले की, ‘देश चल पडा है|’ देशवासीयांनी कॉंग्रेस हटवण्याचा निर्धार पक्का केला आहे. त्यामुळे आता कॉग्रेसला जनता उखडून फेकणारच आहे. २००४ ला भाजपाची सत्ता येणारच.  त्यामुळे भाजपाचे सुशासन काय आहे ते देश पुन्हा अनुभवेल. देशाच्या ७५ व्या स्वातंत्र्यदिनापर्यंत भारत देश जगात सर्वश्रेष्ठ ठरेल, असा प्रचंड चैतन्यमयी विचार मोदी यांनी मांडला. ‘माना के अंधेरा घना है, लेकीन दिया जलाना कहां मना है’, असा आशावादी विचार मोदींनी मांडून भाजपा कार्यकर्त्यांत, जनात आणि मनामनात असे चैतन्य दिप पेटवले आहेत.
 इतके सकारात्मक विचार मोदींनी मांडले असताना त्यांच्या आणि भाजपाच्या कार्यकारिणीच्या बैठकीला अतिशय नकारात्मक आणि हिनपणे प्रसिद्धी देऊन भाजपाचा अश्‍वमेघ रोखण्याचा प्रयत्न प्रसारमाध्यमांनी केला. भाजपा आणि विशेषत: मोदींबाबत हे सुरूच आहे. पण या सर्व नकारात्मकतेचे पितळ आता उघडे पडले आहे, जनता वास्तव काय आहे ते समजून चूकली आहे. प्रचंड संकटांना तोंड देणारी जनता २०१४ च्या निवडणूकीत कॉंग्रेसला पळता भुई थोडी केल्या शिवाय राहणार नाही.
तरुण भारत, आसमंत, १० मार्च २०१३.
अमर पुराणिक 
 हे सर्व प्रकार पाहिल्यानंतर सनी देओल जे म्हणतो त्यातील तथ्य लक्षात येऊ शकते. असे अनेक विकृत प्रकार न करता देखील अनेक चांगले चित्रपट देता येऊ शकतात. अनेक भारतीय चित्रपट निर्माता-दिग्दर्शकांनी असे उत्तमोत्तम चित्रपट दिलेले आहेत. अनेक चित्रपटांनी इतिहास निर्माण केलेला आहे, हे विसरता कामा नये. उत्तम दर्जाला उत्तम बाजारपेठ मिळते हे त्रिकालाबाधित सत्य आहे. त्याला फक्त योग्य प्रसिद्धी मिळाली पाहिजे. असे झाले तर चांगल्या चित्रपटांचे नक्कीच कौतुक होते, झालेले आहे. मग ते समांतर सिनेमे असूद्यात किंवा व्यावसायिक असूद्यात. भारतीय पुरस्कार देताना देखील त्याचा दर्जा सांभाळणे महत्त्वाचे आहे. वशिलेबाजी, भ्रष्टाचाराला फाटा दिला पाहिजे. उत्तमोत्तम चित्रपटांना त्यांच्या श्रमाचे कौशल्याचे बक्षीस मिळाले पाहिजे. असे झाले तर भारतीय पुरस्कारांचे देखील महत्त्व नक्कीच वाढेल. किंबहुना ऑस्करपेक्षाही हे पुरस्कार मोठे ठरतील. त्यामुळे आपण भारतीयांनी ऑस्करसारख्या पुरस्कारांच्या पाठीमागे लागून ऑस्करचे महत्त्व नाहक न वाढवता केवळ दर्जाला महत्त्व दिले तर सनी देओलला ‘भारतीयांना ऑस्करमध्ये जाण्याची गरज काय?’ असा सवाल विचारायचा प्रसंग येणार नाही आणि माध्यमांना सनीच्या योग्य विधानावर विनाकारण भूवया उंचवायची संधी मिळणार नाही.

 हिंदी सिनेसृष्टीतील आघाडीचा अभिनेता सनी देओल याने, ‘भारतीयांना ऑस्करमध्ये जाण्याची गरजच काय?’, असे मत व्यक्त केले. सनीच्या या वक्तव्यावर माध्यमांनी बर्‍याच उलट-सुलट बातम्या दिल्या, पण एक भारतीय म्हणून विचार करता सनी देओल यात काय चुकीचे बोलला हा प्रश्‍न महत्त्वाचा ठरतो. भारतीय प्रेक्षकांची करमणूक करणे हेच भारतीय कलावंतांचे काम आहे आणि हाच उद्देश डोळ्यापुढे ठेवायला हवा. सनी पुढे म्हणतो, ‘भारतीयांनी ऑस्करमध्ये जाण्यासाठी इतकी धावपळ का करावी?, आपण आपल्या देशात समाधानी नाही काय?, या देशातील पुरस्कार प्राप्त करून आपले समाधान होत नाही काय?’ असे प्रश्‍न सनी देओलने केला आहे. ‘माझे असे स्पष्ट मत आहे की, आपल्या देशातील १३० कोटी नागरिकांचे मनोरंजन करणे, हेच आपले पहिले कर्तव्य आहे’, असे मतही त्याने यावेळी व्यक्त केले.
खरं तर, सनीने उपस्थित केलेले प्रश्‍न महत्त्वाचे आहेत. ऑस्कर पुरस्काराचे इतके महत्त्व का?, भारतीय चित्रपटांना आणि भारतीय पुरस्कारांना महत्त्व नाही का? की आपल्या आजपर्यंतच्या पाश्‍चिमात्त्यांच्या गुलामीच्या मानसिकतेचे हेही एक प्रतीक आहे?, भारतीय सिनेमांचा दर्जा कमी आहे का? असे अनेक प्रश्‍न उपस्थित होतात.
८५ व्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात भारतीय कलावंतांची भूमिका असलेल्या  ‘लाईफ ऑफ पाय’ या चित्रपटाला चार ‘ऑस्कर’ पुरस्कार मिळाले आहेत. भारतीय कलावंतांनी या चित्रपटात काम केले असल्याने, भारतीयांना या पुरस्कारांचा आनंद होतो आहे. एका बाजूला ही आनंदाची गोष्ट असताना. दुसर्‍या बाजूला या स्पर्धेत ‘बर्फी’ या चित्रपटाला ऑस्करसाठी नामांकन मिळाले, पण पुरस्कार मिळाला नाही याचे दु:खही आहे. पण असे का होते याचा विचार मात्र होताना दिसत नाही.
मुळात ऑस्करचे इतके महत्त्व का? हा प्रश्‍न महत्त्वाचा आहे. ऑस्करचे इतके महत्त्व वाढण्याचे कारण म्हणजे ऑस्करचा प्रचार, सातत्य, दर्जा, नावीन्याला प्राधान्य हे काही महत्त्वाचे मुद्दे आहेत. यातून आजपर्यंत अनेक चांगल्या चित्रपटांना पुरस्कार मिळाले आहेत. ही काही महत्त्वाची कारणे ऑस्करचा सन्मान वाढवण्यास कारणीभूत आहेत. हे भारतीय पुरस्कारांच्या बाबतीत होऊ शकत नाही का?
भारतात एनएफडीसी, राष्ट्रीय पुरस्कारांना देखील तितकाच दर्जा होता, महत्त्व होते. हे महत्त्व साधारणपणे १९९५ पर्यंत टिकून होते. पण नंतर मात्र ही पत घसरत गेली. ही पत घसरण्याला अनेक कारणे आहेत. साधारणपणे ७०-८० च्या दशकातील समांतर चित्रपट पाहिले की हे लक्षात येते की, भारतीय चित्रपटही खूप दर्जेदार होते, पण व्यावसायिकतेच्या आक्रमणात हे समांतर चित्रपट मागे पडत गेले. ओम पुरी, नसिरुद्दिन शहा, मिथुन चक्रवर्ती, स्मिता पाटील, शबाना आजमी, अमरिश पुरी, कुलभूषण खरबंदा, अनुपम खेर, मास्टर मंजुनाथ, रघुवीर यादव असे अनेक दर्जेदार कलावंत याच समांतर चित्रपटांतून पुढे आले. मृणाल सेन, गुलजार, सत्यजित रे, के. बालाचंदर, के, विश्‍वनाथ, बापू, श्याम बेनेगल, गोविंद निहलानी असे अनेक दर्जेदार दिग्दर्शक या समांतर चित्रपटांनी दिले. मग हे चक्र का थांबले हा प्रश्‍न महत्त्वाचा ठरतो. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे पुरस्कारांचे व्यावसायिकीकरण आणि सुमार दर्जांच्या व्यावसायिक चित्रपटांचा समांतर चित्रपटात शिरकाव आणि अशा टूकार चित्रपटांना पुरस्कार आणि भाडोत्री उदो,उदो (माध्यमांनी केलेला). समांतर सिनेमे हे केवळ ‘दाद’ आणि ‘पुरस्कार’ यांचे भूकेले असतात. समांतर सिनेमातून पैसा मिळवणे हे अशक्यप्राय म्हणावे लागेल. मग कमीत कमी उत्तम दर्जाच्या चित्रपटांना योग्य चिकित्सा करून न्याय देणे, पुरस्कार दिले जाणे महत्त्वाचे ठरते. नेमके हेच १९९५ नंतर घडले नाही. वशिलेबाजी, पुरस्कार मॅनेज करणे, पुरस्कार विकत घेणे असे अनेक भ्रष्ट प्रकार घडू लागले आणि समांतर सिनेमांचा सूर्यास्त होऊ लागला. त्याबरोबर दर्जेदार सिनेमांचाही दुष्काळ पडला. समांतर सिनेमांची व्यावसायिक सिनेमांबरोबर तांत्रिक बाबतीतच तुलना होऊ लागली आणि चित्रपटांचे विषय, गुणवत्ता दुर्लक्षिल्या जाऊ लागल्या. यामुळे पुरस्कारांचे महत्त्व आणि पत कमी होऊ लागली. राष्ट्रीय पुरस्कारांनाही पत राहिली नाही.
यासारखी अनेक कारणे, पैलू ऑस्करचे महत्त्व वाढवण्यास कारणीभूत आहेत. परदेशी चित्रपट महोत्सवामध्येही भारतीय संस्कृती आणि भारतीय दर्जेदार सिनेमे सादर झालेले किंवा त्या अनुषंगाने निर्माण केलेले सिनेमे दिसत नाहीत. ७०-८० च्या दशकात भारताचे दारिद्र्य समांतर चित्रपटांमधून, चित्रामधून मांडण्याचा प्रकार झाला आणि त्याला या परकीयांनी उचलून धरले. सहाजिकच प्रत्येक जण आंतरराष्ट्रीय दर्जावर पोहोचण्यासाठी तेच करू लागला. याचा अर्थ ऑस्करवाले किंवा आंतरराष्ट्रीय चित्रपट परीक्षक, समीक्षक हे दर्जापेक्षा आंतरराष्ट्रीय राजकारणच जास्त खेळत होते. ते भारतीय संस्कृती आणि आणि उत्तम दर्जेदार चित्रपट डावलत होते आणि अजूनही तेच करत आहेत. आपल्या भारतीयांनाही भारतीय संस्कृती आणि आपण भारतीय असण्याची लाज वाटते. मग अशा विषयांचे चित्रपट आंतरराष्ट्रीय स्तरावर नेेणे आणि मांडणे ही दूरची बाब झाली. यामुळेच अभिनेता सनी देओलने मांडलेल्या मताचे महत्त्व आहे. आपल्याला आपण भारतीय असल्याचे गर्व असणे आणि आपल्या भारतीय संस्कृतीचा अभिमान असणे, आपल्या कौशल्यावर विश्‍वास असणे याचे महत्त्व सनीने अधोरेखित केले आहे.
दुसर्‍या बाजूला ऑस्करसाठी चित्रपट पाठवत असताना आपले भारतीय कलावंत अनेक गोष्टीत कमी पडतात. एक म्हणजे ‘युनिकनेस’, ‘अद्वितीय’. ऑस्करसाठी चित्रपट हा वेगळ्या विषयावर असावा ही सामान्य आर्हता आहे. ऑस्करच नव्हे तर, कोणत्याही पुरस्कारांसाठी निवड व्हावी म्हणून असे वेगवेगळ्या विषयांवर चित्रपट निर्माण करणे महत्त्वाचे असते. असे असताना अमीर खानने ‘लगान’ हा चित्रपट ऑस्करसाठी पाठवला. पण लगान हा चित्रपटच मुळात इंग्रजी चित्रपटावरून चोरलेला असताना आपण ऑस्कर पुरस्कार मिळण्याची अपेक्षा कशी ठेऊ शकत होतो. अमीर खानने ‘लगान’ हा चित्रपट जॉन हस्टन दिग्दर्शित आणि सिल्वेस्टर स्टॅलन, मायकल केन, फुटबॉलपटू पेले, डॅनियल मेस्सी अभिनीत १९८१ साली प्रदर्शित झालेल्या ‘एस्केप टू व्हिक्टरी’ या इंग्रजी चित्रपटाची भ्रष्ट नक्कल होता. व्हिक्टरीमध्ये विषय फुटबॉलवर तर लगानमध्ये क्रिकेट इतकाच बदल होता. मग अशा चोरलेल्या चित्रपटांना कसे पुरस्कार मिळतील. ‘व्हिक्टरी’ला ऑस्करचे नामांकन मिळालेले नसताना ‘लगान’ला नामांकन मिळाले हिच आश्‍चर्यकारक गोष्ट म्हणावी लागेल. शिवाय आंग्लसाहेबांना स्वत:चा अपमान करणारे चित्रपट कसे आवडतील.
दुसरा ऑस्करप्राप्त चित्रपट म्हणजे ‘स्लमडॉग् मिलेनियर’. या चित्रपटाने ऑस्कर पटकावला. आम्हा भारतीयांना त्याचा प्रचंड आनंद ही झाला. पण यावर आपण एक भारतीय म्हणून आत्मपरीक्षण करताना मात्र आपल्याला संताप आल्यावाचून राहत नाही. ‘स्लमडॉग मिलेनियर’सारख्या सूमार आणि घाणेरड्या चित्रपटाला ऑस्कर मिळतो हा धक्का आपल्याला बसल्याशिवाय राहत नाही. बीभत्स आणि घाणेरडे चित्रण, सुमार विषय आणि विस्कळीत कथा असतानाही या चित्रपटाला पुरस्कार मिळाला. यापाठीमागे केवळ आंतरराष्ट्रीय राजकारण आणि  भारतीय बाजारपेठ हेच कारण असू शकते.
आजपर्यंत ऑस्कर पुरस्कार निवडीबाबतही अनेक घोटाळे आणि आरोप झालेले आहेत, वशिलेबाजी झालेली आहे, राजनैतिक आणि आर्थिक गणिते उघडी पडली आहेत. याही वेळी  इराणमधील ओलिस नाट्यावर आधारित बेन ऍफलेक्स यांच्या ‘ऑर्गो’ या चित्रपटाला तीन ऑस्कर पुरस्कार मिळाले आहेत, पण अर्गोला सर्वोत्तम चित्रपटाचा मिळालेला पुरस्कार राजकीयदृष्ट्या प्रेरित असल्याचा आरोप इराणचे सांस्कृतिक मंत्री मोहम्मद होसैनी यांनी केला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या पत्नी मिशेल ओबामा यांनी व्हाईट हाऊसचे प्रतिनिधित्व करत पुरस्कार सोहळ्यास उपस्थित राहणे हे पुरस्कार मिळवण्यामागे पहिले कारण असल्याचा दावा इराणमधील प्रसारमाध्यमांनी केला आहे. इराण विरोधी चित्रपटाला पुरस्कार सोहळ्यास नामांकन देण्यात येणे आणि त्याचवेळी मिशेल ओबामा यांनी उपस्थित राहणे यामागे पाणी मुरत असल्याचे इराणच्या प्रसारमाध्यमांचे म्हणणे आहे. इराण विरोधी असल्याने कोणतेही कथानक आणि तांत्रिक बाबी नसूनही अर्गो चित्रपटाला पुरस्कार दिल्याचा आरोप होसैनी यांनी केला आहे. यातून पाश्‍चिमात्त्य राष्ट्रांचे आंतरराष्ट्रीय राजकारण उघड होते.
भारतीय चित्रपट ऑस्करमध्ये जावेत, त्यांना पुरस्कार मिळावेत म्हणून आपल्या बर्‍याच निर्मात्या, दिग्दर्शकांनी नावीन्यांच्या नावाखाली विकृतीला महत्त्व दिले, विकृत चित्रपट बनवले, केवळ बनवले नाही, तर भारतीय प्रेक्षकांवर जबरदस्ती प्रचार करून लादण्याचा प्रयत्न केला. तशी विकृत संस्कृती रुजवण्याचेही प्रयत्न झाले आहेत.
हे सर्व प्रकार पाहिल्यानंतर सनी देओल जे म्हणतो त्यातील तथ्य लक्षात येऊ शकते. असे अनेक विकृत प्रकार न करता देखील अनेक चांगले चित्रपट देता येऊ शकतात. अनेक भारतीय चित्रपट निर्माता-दिग्दर्शकांनी असे उत्तमोत्तम चित्रपट दिलेले आहेत. अनेक चित्रपटांनी इतिहास निर्माण केलेला आहे, हे विसरता कामा नये. उत्तम दर्जाला उत्तम बाजारपेठ मिळते हे त्रिकालाबाधित सत्य आहे. त्याला फक्त योग्य प्रसिद्धी मिळाली पाहिजे. असे झाले तर चांगल्या चित्रपटांचे नक्कीच कौतुक होते, झालेले आहे. मग ते समांतर सिनेमे असूद्यात किंवा व्यावसायिक असूद्यात. भारतीय पुरस्कार देताना देखील त्याचा दर्जा सांभाळणे महत्त्वाचे आहे. वशिलेबाजी, भ्रष्टाचाराला फाटा दिला पाहिजे. उत्तमोत्तम चित्रपटांना त्यांच्या श्रमाचे कौशल्याचे बक्षीस मिळाले पाहिजे. असे झाले तर भारतीय पुरस्कारांचे देखील महत्त्व नक्कीच वाढेल. किंबहुना ऑस्करपेक्षाही हे पुरस्कार मोठे ठरतील. त्यामुळे आपण भारतीयांनी ऑस्करसारख्या पुरस्कारांच्या पाठीमागे लागून ऑस्करचे महत्त्व नाहक न वाढवता केवळ दर्जाला महत्त्व दिले तर सनी देओलला ‘भारतीयांना ऑस्करमध्ये जाण्याची गरज काय?’ असा सवाल विचारायचा प्रसंग येणार नाही आणि माध्यमांना सनीच्या योग्य विधानावर विनाकारण भूवया उंचवायची संधी मिळणार नाही.
तरुण भारत, आसमंत, ३ मार्च २०१३.